मुरजी पटेल यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाचा आक्षेप

  231

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुरजी पटेल यांना ६ वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले असतानादेखील उमेदवारी अर्ज कसा काय स्विकारला, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. तसेच मुरजी पटेल यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यासाठी अंधेरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.


शिवसेनेचे माजी नगरसेवक व ठाकरे गटातर्फे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल करणारे संदीप नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेत मुरजी पटेलांवर गंभीर आरोप केले.


मुरजी पटेल यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खोटे कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सहा वर्षाकरिता निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. असे असतानासुद्दा त्यांचा निवडणुकीचा अर्ज कोणत्या नियमानुसार आपण स्विकारलात? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.


तसेच, दिलेल्या माहितीची शहानिशा करुन मुरजी पटेल यांचा अर्ज रद्द करावा, अशी विनंतीदेखील नाईक यांनी केली आहे.


तसेच, अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप व शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी स्वत:वर दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली, असा गंभीर आरोपही नाईक यांनी केला आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर