अमूलपाठोपाठ मदर डेअरीचेही दूध महागले

  88

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा मोठा झटका बसला आहे. अमूल दूधाच्या दरवाढीनंतर आता मदर डेअरीने त्यांच्या फुल क्रिम आणि गायीच्या दूधाच्या किमती २ रुपये प्रतिलिटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर १६ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील असे कंपनीकडून सष्ट करण्यात आले आहे. लागू करण्यात आलेली ही दरवाढ दिल्ली आणि एससीआरमध्ये लागू असणार आहे.


शनिवारी सकाळीच अमूलने त्यांच्या दूध दरात प्रति लीटर २ रुपयांची वाढ करत असल्याचे जाहीर केले होते. सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत.


आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यानंतर आता दिल्ली एससीआरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झटका बसला असून, मदर डेअरीने त्यांच्या फुल क्रिम आणि गायीच्या दुधात प्रति लीटर २ रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. करण्यात आलेली दरवाढ १६ नोव्हेंबरपासून लागू होईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र