भांडूपमध्ये मोठी जलवाहिनी पुन्हा फुटली; मनसेचा महापालिकेला घेराव

किशोर गावडे


मुंबई : भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर भागांना पाणी पुरवठा करणारी ९०० मीमी व्यासाची मुख्य जलवाहिनी, भांडुप पश्चिम विभागात क्वारी रोडवर सन २०१५ पासून आतापर्यंत जवळपास २४ वेळा फुटली आहे. आतातर गेल्या ३७ दिवसात ७ वेळा फुटल्याने भांडुप विधानसभा मनसेच्या वतीने आज दुपारी एस विभागाच्या कार्यालयावर निषेध व्यक्त करत जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना व सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांना घेराव घालण्यात आला.


या पाईप फुटीमुळे क्वारी रोडवर पुरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे होणारे हाल, याबद्दल जाब विचारण्यासाठी आणि प्रशासनाला जागं करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडुप विधानसभेच्या वतीने एस विभाग, सहायक आयुक्त श्री. आंबी तसेच पाणी खात्याचे अधिकारी यांना घेराव घालत निषेध धिक्कार व्यक्त केला. यावेळी झालेल्या बैठकीत महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.


यावेळी मनपा प्रशासनाने दुरुस्ती करून घेण्याबाबत खोडसाळ पद्धतीने उत्तरे देण्यास सुरुवात केल्यानंतर महिला आक्रमक झाल्या होत्या. अखेर सहाय्यक आयुक्त आंबी यांनी शिष्टमंडळाला जलवाहिनी दुरुस्तीबाबत व जलदगतीने काम पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक कामगार लावून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.


क्वारी रोडवरील छत्रपती संभाजी मार्केट ते हनुमान हॉटेल दरम्यानची जीआरपी (फायबर) जलवाहिनी बदलून २०० मी. लांब एम एस (लोखंडी) जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. हे काम एक महिन्यात पुर्ण होईल, असे आंबी यांनी सांगितले.


तसेच भांडुप रीझर्वायर (पाण्याची टाकी - रमाबाई नगर) ते मंगतराम पेट्रोल पंप दरम्यान सदर जलवाहिनीला पर्यायी अशी नवी एम. एस. (लोखंडी) जलवाहीनीचे कामही तातडीने तीन टप्प्यांत सुरू करण्यात येईल. जे पुर्ण होण्यास साधारण एक ते दिड वर्षाचा कालावधी लागू शकतो. सदर दोन्ही कामांमध्ये अडथळा येऊ नये व निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे याकरिता संबंधित सर्व खात्यांच्या परवानग्या, पत्र व्यवहार इ. बाबतीत चर्चा झालेली असून दररोज याबाबतचा आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले.


त्यातूनही जर पुन्हा, विशेषतः दिवाळी दरम्यान पाणी गळती झालीच तर संपूर्ण विभागात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आत्ताच नियोजन करण्यात येत आहे, असेही आंबी यांनी सांगितले. यावेळी, माजी नगरसेविका अनिषा अमोल माजगावकर, विभाग अध्यक्षा व माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे तारकर, उपविभाग अध्यक्षा आशा बनकर, स्नेहा माळगावकर, शाखा अध्यक्षयतीन सावंत, राजश्री पालांडे, अंकिता राणे, मनविसे विभाग संघटक प्रतिक वंजारे, विभाग सचिव, नितिन साळकर, माजी उपविभाग अध्यक्ष अनिल राजभोज आदी मनसे महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि