दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी शमीला संधी

  71

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुखापतग्रस्त गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ऐवजी मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत शमी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे.


भारतीय गोलंदाजीची धार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळणार? याकडे देशभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. या रेसमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे तीन खेळाडू होते. यात मोहम्मद शमीने बाजी मारली आहे.


अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने भारताच्या आयसीसी टी-२० विश्वचषक संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड केली आहे. शमी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे आणि सराव सामन्यांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये संघाशी संपर्क साधेल. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचीही संघात बॅकअप खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.


आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी लागलेले दुखापतीचे ग्रहण भारतीय संघाची पाठ सोडायचे नाव घेत नाही. अष्टपैलू रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि चहर अशी तीन खेळाडूंना दुखापतीचा फटका बसला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

Comments
Add Comment

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १०

युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,