दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी शमीला संधी

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुखापतग्रस्त गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ऐवजी मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत शमी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे.

भारतीय गोलंदाजीची धार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळणार? याकडे देशभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. या रेसमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे तीन खेळाडू होते. यात मोहम्मद शमीने बाजी मारली आहे.

अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने भारताच्या आयसीसी टी-२० विश्वचषक संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड केली आहे. शमी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे आणि सराव सामन्यांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये संघाशी संपर्क साधेल. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचीही संघात बॅकअप खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी लागलेले दुखापतीचे ग्रहण भारतीय संघाची पाठ सोडायचे नाव घेत नाही. अष्टपैलू रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि चहर अशी तीन खेळाडूंना दुखापतीचा फटका बसला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

41 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

48 minutes ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

4 hours ago