अंधेरी पोटनिवडणूक चुरशीची होणार!

मुंबई : अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपसाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत मुरजी पटेल यांच्यासोबत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट)चे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, खासदार मनोज कोटक, भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, अमित साटम, मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी सहभागी झाले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजप आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपनेही मुरजी पटेलांचे दोन अर्ज दाखल केले आहेत.


दरम्यान, मूळ शिवसेना ही आमच्या बाजूने असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे.


अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, अंधेरीच्या जनतेचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. तसेच मी केलेल्या जनसेवा कार्यावरही माझा विश्वास आहे. अंधेरीच्या लोकांसाठी काम करणे हे माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे आणि पुढेही राहील. अंधेरीच्या या पोटनिवडणुकीत ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर! मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ! महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या