चीनकडून १३०० भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजुर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महासाथीच्या दोन वर्षानंतर चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चीनने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर केला आहे.


चीनच्या परराष्ट्र खात्याने भारतीय दूतावासाला दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना महासाथीची लाट सुरू झाल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून दोन्ही देशातील थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. नुकतेच, ३०० भारतीय व्यावसायिक चीनमधील फॅक्टरी हब असलेल्या यिवूमध्ये दोन चार्टर विमानाने दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे आशियाई विभागाचे संचालक लिऊ जिन्साँग यांनी भारतीय राजदूत प्रदीप रावत यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी भारत-चीनमधील द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती आदी विविध मुद्यांबाबत चर्चा झाली.


कोरोना महासाथीनंतर चीनने ऑगस्ट महिन्यात कोरोना निर्बंध शिथील केले. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये येण्यास परवानगी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आयसोलेशनच्या कालावधीत ही कपात करण्यात आली. आता सात दिवस हॉटेलमधील आयसोलेशन आणि घरी तीन दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. जूनमध्ये हा कालावधी १४ आणि सात दिवसांचा होता. चीनच्या सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याने मागील महिन्यात परदेशी नागरिकांसाठीचे निर्बंध शिथिल करण्यासाठीच्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. चीनमधील कोरोना निर्बंधामुळे चिनी विद्यापीठांमध्ये नोंदणी केलेले २३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशीच अडकले होते.


चीनमध्ये अद्यापही थेट उड्डाणे सुरू झाले नाहीत. चीनमध्ये दाखल झालेले भारतीय विद्यार्थी हे हाँगकाँग मार्गे दाखल झाले आहेत. हाँगकाँग मार्गे दाखल होणाऱ्यांसाठी तीन दिवसांचे सेल्फ मॉनिटरिंग आवश्यक आहे. तर, क्वारंटाइन सक्तीचे नाही. मात्र, अद्यापही विमान प्रवासाचे तिकीट दर अधिक आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनानंतर कोरोना निर्बंध शिथिल होतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, निर्बंध शिथिल झाले नाहीत. मात्र, चीनमधील काही भागांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीए५.१.७ आढळल्याने निर्बंध पूर्णपणे शिथिल होणार नसल्याचे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च