नाशिकमध्ये खोटी वर्क ऑर्डर देऊन साडेअकरा लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी) : शासकीय योजनेच्या कामासाठी कोणतेही साहित्य, मशिनरी न पुरविता खोटी वर्क ऑर्डर देऊन एका तरुणाची साडेअकरा लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तौसिफ खान आयुब खान (वय २४, रा. विवरे खुर्द, ता. रावेर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी निखिल विजयानंद अहिरराव (वय ४२, रा. श्री लक्ष्मीनिवास, लीलावती हॉस्पिटलमागे, मखमलाबाद रोड, नाशिक) याने त्याच्या मालकीच्या इन्स्पायर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीतून ‘वन नेशन वन रेशन स्मार्ट कार्ड’ या शासकीय योजनेची फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी तौसिफ खान याने अहिरराव यांच्याशी संपर्क साधला.


दरम्यान, अहिरराव यांनी फिर्यादी तौसिफ खान यांना नाशिक रोड येथील पंचकच्या जवळ असलेल्या शनी मंदिरानजीक सरस्वतीनगर बंगला येथे बोलावले. त्यावेळी आरोपी अहिरराव याने फिर्यादी खान याला कंपनीमार्फत वन नेशन वन रेशन स्मार्ट कार्ड या शासकीय योजनेची माहिती देऊन त्या कामासाठी लागणारे साहित्य व मशिनरी पुरविण्यासाठी खान यांच्याकडून दि. १५ नोव्हेंबर २०१९ ते दि. ४ जानेवारी २०२२ या कालावधीत वेळोवेळी बँकेद्वारे ११ लाख ४० हजार रुपयांची रक्कम उकळली; मात्र एवढी मोठी रक्कम देऊनही आरोपी अहिरराव याने खान यांना या योजनेच्या कामासाठी लागणारे साहित्य व मशिनरी न पुरविता खोटी वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळले.


मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने खान यांनी आरोपी अहिरराव याला दिलेली रक्कम परत मागितली. मात्र अहिरराव याने खान यांना जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर तौसिफ खान यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे गाठून आरोपी अहिरराव याच्याविरुद्ध फसवणूक व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाचोरकर करीत आहेत.

Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर