सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे व आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांत हाणामारी होईल, या उद्देशाने या तिन्ही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, असा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हाही या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाने नुकतीच महाप्रबोधन यात्रा काढली होती. यानिमित्त झालेल्या मेळाव्यात ठाकरे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. आमदार भास्कर जाधव यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करताना कागद कसे वाचून दाखवतात, याची नक्कलच करुन दाखवली होती. सुषमा अंधारे यांनीही शिंदेंसह मोदींवर बोचरी टीका करत चाय विकता विकता पंतप्रधानांनी देश विकल्याची टीका केली होती. तर, खासदार विनायक राऊत यांनी शिंदेंसह नारायण राणेंवरही बोचरी टीका केली होती.


ठाण्यातील या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचाही यात समावेश आहे.


शिंदे गटाने नौपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आली. तसेच, यावेळी नेतेमंडळींनी केलेल्या भाषणामुळे दोन गटांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

माहीम मध्ये पुन्हा सुरू झालाय ‘सी फूड प्लाझा'

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद'

ऐतिहासिक! ‘झवेरी बाजार’चा मुख्य रस्ता आता फक्त चालण्यासाठी खुला!

मुंबई : मुंबईतील खूप प्रसिद्ध असलेल्या झवेरी बाजारातून थेट मुंबादेवी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता, बाजाराच्या

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

दिल्लीमध्ये खास भेट! नितीन गडकरींच्या हातून संकर्षणला खास पुस्तक भेट

दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता.

"तो कुठेही जाणार नाही!" विराट कोहलीच्या RCBमधील भविष्यावर मोहम्मद कैफ यांची प्रतिक्रिया!

कोहली RCBमध्येच राहणार, निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रॉयल