सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे व आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांत हाणामारी होईल, या उद्देशाने या तिन्ही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, असा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हाही या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाने नुकतीच महाप्रबोधन यात्रा काढली होती. यानिमित्त झालेल्या मेळाव्यात ठाकरे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. आमदार भास्कर जाधव यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करताना कागद कसे वाचून दाखवतात, याची नक्कलच करुन दाखवली होती. सुषमा अंधारे यांनीही शिंदेंसह मोदींवर बोचरी टीका करत चाय विकता विकता पंतप्रधानांनी देश विकल्याची टीका केली होती. तर, खासदार विनायक राऊत यांनी शिंदेंसह नारायण राणेंवरही बोचरी टीका केली होती.


ठाण्यातील या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचाही यात समावेश आहे.


शिंदे गटाने नौपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आली. तसेच, यावेळी नेतेमंडळींनी केलेल्या भाषणामुळे दोन गटांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस