मुंबई : आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज रंगशारदा येथे बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, आगामी महानगरपालिका निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. राज यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वादावर फार थेटपणे भाष्य केले नाही. परंतु, राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाहीत. याउलट मनसेबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. याचा फायदा घ्या. दिवाळीत घरोघरी जाऊन प्रचार करा. सकारात्मक आणि प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी. तसेच सत्ता आल्यावर मी तुम्हालाच पदावर बसवेन, मी कोणतेही पद घेणार नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी…
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मागणी मुंबई : किनारपट्टीवर राहत असलेल्या मच्छीमार समाजावर…
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत.…
संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम…
मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान…