मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दरोडेखोरांची टोळी सक्रिय!

Share

विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नुकतेच काही दिवसांपूर्वी सळयांनी भरलेला एक ट्रक दरोडेखोरांनी पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा याच महामार्गावर मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच १ कोटी ३९ हजार रूपयांच्या सिगारेटच्या मुद्देमालाने भरलेला ट्रक दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

नवी मुंबईतील रबाळे येथून सिगारटचे तयार उत्पादन असलेला सुमारे १ कोटी ३९ हजारांचा मुद्देमाल अज्ञात दरोडेखोरांनी ट्रकचालकासोबत पळवून नेला. मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकवार गावच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास चारचाकी गाडीने आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी हा ट्रक लंपास केला. ट्रकचालकाला नंतर राष्ट्रीय महामार्गावर सोडून दरोडेखोरांनी हा ट्रक पळवून नेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महामार्गावर सध्या चालत्या ट्रकवर दरोडा टाकून तो पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. पोलिसांनी महामार्गावर जागता पहारा ठेवण्याची सध्यस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा एखाद्या दरोड्यात निरपराध वाहनचालकाचा जीव जाण्याचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.

Recent Posts

Mann Ki Baat: दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एकजूट होण्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश

नवी दिल्ली: पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. या हल्ल्यामध्ये…

10 minutes ago

Solapur to Goa Flight Service : सोलापूरहून थेट गाठता येणार गोवा! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

सोलापूर : सोलापूरकरांची (Solapur News) आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. मागील…

29 minutes ago

स्वस्त फ्लाईट तिकीट मिळवायचंय मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी

मुंबई : आपल्याला कधीकधी कामानिमित्त किंवा फिरायला जाताना विमान प्रवास करावा लागतो. विमान प्रवास कितीही…

53 minutes ago

पाकिस्तानने भारताला दिली अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे.…

58 minutes ago

महाराष्ट्र दिनी महिलांना मिळणार खास गिफ्ट

मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग…

1 hour ago

महाराष्ट्रात ५०२३ पाकिस्तानी नागरिकांची नोंद

नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४ मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी…

1 hour ago