मुंबई : दाऊद टोळीशी संबंधित ५ जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. दाऊदचा साथीदार छोटा शकील आणि रियाज भाटीला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अजय गंडा, फिरोज लेदर, समीर खान, पापा पठाण आणि अमजद रेडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलीकडेच गँगस्टर छोटा शकील आणि मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता मंगळवारी याच प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
वर्सोवा येथील एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून ३० लाखांची कार आणि ७.५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात या सर्वांची भूमिका समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान अधिक माहिती समोर येण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…