नाशिक बस दुर्घटनेतील आरोपी ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक

नाशिक : आडगाव पोलिसांनी काल मध्यरात्री नाशिक बस अपघातातील संशयित चालक रामजी जगबिर यादव याला अटक केली आहे. नाशिक येथे शनिवारी सकाळी ट्रक आणि एका खासगी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याची दुर्घटना घडली होती. त्या अपघातात १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास २५ ते ३० लोकं जखमी झाले होते. त्यानंतर ट्रक चालक फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रामजी यादव असं आरोपी ड्रायव्हरचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, काल पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारात नाशिक येथील नांदूर नाक्याजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने पेट घेतला. त्यानंतर काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपले जीव वाचवले होते तर काहीजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर ज्या ट्रकने या बसला धडक दिली होती त्या ट्रकचा ड्रायव्हर घटना स्थळावरून फरार झाला होता.


रामजी यादव असे त्या ड्रायव्हरचे नाव असून तो २७ वर्षाचा आहे. मुळचा उत्तरप्रदेशचा असलेल्या रामजी याला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ अ २७९, ३३६, ३३७, ३३८, ४२७ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४ अ ब अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये