बीकेसी दसरा मेळाव्याच्या खर्चाची तपासणी होणार?

  29

मुंबई : बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी एसटी बसेस, तसेच मेळाव्याच्या प्रमोशन, जाहिराती, समर्थकांच्या खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले. नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली? त्यांच्यावतीने कोणी खर्च केला? त्यांच्या पैशाच्या स्त्रोताबाबत मनी लॉड्रिंग अॅक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदीअंतर्गत चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


शिवसेनेचे नेते संयज राऊत यांना ५६ लाख रुपये, अनिल देशमुख यांना ४.५ कोटी व नवाब मलिक यांची चौकशी करुन त्यांना अटक करण्यात येऊ शकते तर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी खर्च केलेल्या रकमेची चौकशी करण्यात यावी, असे या जनहित याचिकेत म्हटले आहे.


त्यामुळे याप्रकरणी याच तत्त्वार शिंदे यांची सीबीआय, ईडी, आर्थिक गुन्हे विभाग आणि आयकर विभागाला चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.


संजय राऊत, अनिक देशमुख यांची ज्याप्रमाणे चौकशी करण्यात आली, त्याप्रमाणे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जगदेव यांनी याचिकेमध्ये केली आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र