कोरोना काळात सेव्हन हिल्सचे मोठे योगदान

मुंबई (प्रतिनिधी) : मार्च २०२० चा तो काळ होता. त्यावेळी चीनसह जगभरात कोरोनाने हैदोस घालायला सुरुवात केली होती. भारतातही कोरोनाचा प्रवेश झाला आणि साऱ्या आरोग्य व्यवस्थेची तारांबळ उडाली. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. जगभरात कोणालाच या रोगाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे रुग्णांवर कसे उपचार करावेत? याबाबत कोणीच ठोस मार्गदर्शन करत नव्हते. अशा कठीण काळात दाटीवाटीने वसलेली वस्ती असलेल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या मुंबईसमोर कोरोनाला रोखण्याचे आव्हान होते. आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, परिचारीका, कर्मचारी यांनी चोवीस तास झटत कोरोनाविरोधात लढा दिला.


महिनोनमहिने ही लढाई अविरत चालली. आरोग्य व्यवस्था अक्षरश: पणाला लावली, अशा भारावलेल्या आणि तितक्याच धीरगंभीर आठवणी जागवल्या त्या कोरोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले लो. टिळक रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी दैनिक प्रहारच्या १४व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, दैनिक प्रहारचे प्रशासन व लेखा प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी डॉ. मोहन जोशी आणि बीग बॉस फेम, वृत्त निवेदक रत्नाकर तारदाळकर यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. दैनिक प्रहारचे वरिष्ठ उपसंपादक दीपक परब यांनी ज्येष्ठ पत्रकार सुधीर हेगिष्टे यांचे स्वागत केले. दैनिक प्रहारचे उपसंपादक संदीप खांडगे-पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय पुरंदरे यांचे स्वागत केले.


आरोग्य सेवा पणाला


डॉ. मोहन जोशी पुढे म्हणाले की, कोरोनाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मोठमोठे डॉक्टर्स, डीन उपस्थित होते. परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाईन आणि आयसोलेट करण्याचे ठरले. त्याकरिता एअरपोर्टलगतच असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाची निवड करण्यात आली. पण एअरपोर्ट अथॉरिटीकडे स्क्रीनींगसाठी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी नसल्याने पुन्हा पेच निर्माण झाला. त्यावेळी एअरपोर्टवर तत्कालीन पालिका आयुक्त, संचालक यांच्यासह डीन असल्याने मलाही तेथे उपस्थित रहावे लागले. त्यावेळी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. परदेशातून येणाऱ्यांची माहिती घ्यायची, त्यांची तपासणी करून गरज पडल्यास त्यांना दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली. सेव्हन हिल्स रुग्णालय एक ते दोन वर्षे ओस पडून होते. त्यामुळे सेव्हन हिल्सचे कोविड उपचार रुग्णालयात रुपांतर करण्याचे मोठे आव्हान होते. दुसऱ्याच दिवशी आयुक्तांचा मला फोन आला आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाला जाण्याचे आदेश देण्यात आले. माझी बदली तेथे झाली. हे हॉस्पीटल बंद असल्यामुळे भूत बंगल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. सर्वप्रथम सेव्हन हिल्स हॉस्पीटलचे रुपडे पालटण्याची आवश्यकता होती. त्यावर मात केली. मला तेथे २४ तास रहावे लागले.


१२०० ऑक्सिजन बेडचे आणि ३०० आयसीयू बेडचे हॉस्पीटल एका महिन्यात तयार केले. नर्सेस, वॉर्ड बॉय, डॉक्टर्स कसे मिळवायचे हा प्रश्न होता. स्वच्छता करणारे कर्मचारी होते. पण त्याव्यतिरिक्त कोणताच स्टाफ नव्हता. तोही उभा केला. कोरोनाच्या भीतीने आरोग्य कर्मचारी कामावर येत नव्हते. अनेकांना येण्याची इच्छा होती. परंतु भीतीमुळे आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर बंधने घातली. अनेकांना महिनाभर घरी जायला मिळाले नाही. आपल्या परीजनांना भेटायला मिळाले नाही. पण तरीही न थकता कोरोनाविरोधातील लढाई सुरूच होती.


उद्योजक, कलाकार, राजकारणी सर्वांचेच सहकार्य


त्यावेळी मदतीची गरज प्रत्येकालाच होती. आरोग्य कर्मचारी चोवीस तास हॉस्पीटलमध्ये असल्याने त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था होणे गरजेचे होते. मुंबईतील ताज ग्रुपतर्फे मोठ्या संख्येने जेवणा-खाण्याची व्यवस्था झाली. मोठमोठ्या उद्योजकांची मोलाची मदत मिळाली. दिवसभर काम करत असल्याने डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या मानसिक संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण अशा काळात कलाकारांनीही त्यांचे विनामूल्य मनोरंजन केले. मोठमोठ्या हॉटेल्सनी राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. राजकीय नेतृत्वांनीही टेम्पोच्या टेम्पो भरून साधनसामुग्री पाठवली. रक्तदान मोठ्या प्रमाणात झाले. जात-धर्म-पंथ विसरून सारेच जण कोरोना विरोधातील लढाईत सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित