मुंबई : मुंबईत उद्यापासून रिलायन्स जिओची ‘५जी’ सेवा सुरु होणार आहे. या मोठ्या निर्णयाने जिओने मुंबईकरांना दसऱ्याचे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा सर्वात आधी वेगवान इंटरनेटच्या युगात प्रवेश होणार आहे.
रिलायन्स जिओ दसऱ्याच्याच दिवशी मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या मेट्रो शहरांमध्ये ‘५जी’ सेवेची बीटा ट्रायल सुरु करणार आहे. सध्या ही सेवा चाचणी तत्वावर राबवण्यात येणार असून त्यात काही त्रूटी आढळून आल्यास त्या दूर करुन चांगल्या प्रकारची सेवा देता येणार आहे.
सर्वच ‘५जी’ मोबाईल युजर ही सेवा वापरू शकणार नाहीत. कंपनीने यासाठी वेलकम ऑफर जारी केली आहे. यानुसार कंपनी तुम्हाला ‘५जी’ नेटवर्क वापरण्याची संधी देणार आहे. यासाठी तुम्ही कंपनीला फिडबॅक देऊ शकणार आहात.
जिओने ‘५जी’ सेवा इन्व्हाईट बेस्ड ठेवली आहे, म्हणजेच कंपनी ग्राहकांना ‘५जी’ सेवा वापरण्यासाठी निमंत्रित करणार आहे. ज्यांना हे निमंत्रण मिळेल तेच लोक जिओची ‘५जी’ सेवा वापरू शकणार आहेत. किती ग्राहकांना कंपनी निमंत्रीत करणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…