मनसेचे उद्धव ठाकरेंना ८ प्रश्न

मुंबई : उद्धवजी... तुम्हाला 'हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही, असे ट्विट करत मनसेने एक पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. या पत्रात मनसेने उद्धव ठाकरेंना ८ प्रश्न विचारले आहेत.


शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यानिमित्ताने मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.


या पत्रात लिहिले आहे की, उद्धवजी, उद्या शिवतीर्थावर "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो" म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरे द्या.


१. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?


२. पीएफआय सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?


३. एमआयएम, सपा सारख्या पक्षांसोबत दोन चार मतांसाठी हातमिळवणी का केली?


४. सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का रोखले नाही?


५. मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजेत हा बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?


६. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?


७. अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?


८. आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, हे कसे सुचले?


साहजिकच या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसणार. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही, असे म्हणत या पत्राची सांगता करण्यात आली आहे.


https://twitter.com/YogeshKhaire79/status/1577137365742911488

उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर होणार आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा