मनसेचे उद्धव ठाकरेंना ८ प्रश्न

मुंबई : उद्धवजी... तुम्हाला 'हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही, असे ट्विट करत मनसेने एक पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. या पत्रात मनसेने उद्धव ठाकरेंना ८ प्रश्न विचारले आहेत.


शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यानिमित्ताने मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.


या पत्रात लिहिले आहे की, उद्धवजी, उद्या शिवतीर्थावर "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो" म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरे द्या.


१. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?


२. पीएफआय सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?


३. एमआयएम, सपा सारख्या पक्षांसोबत दोन चार मतांसाठी हातमिळवणी का केली?


४. सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का रोखले नाही?


५. मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजेत हा बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?


६. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?


७. अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?


८. आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, हे कसे सुचले?


साहजिकच या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसणार. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही, असे म्हणत या पत्राची सांगता करण्यात आली आहे.


https://twitter.com/YogeshKhaire79/status/1577137365742911488

उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर होणार आहे.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.