मालवण (वार्ताहर) : वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचे लोकार्पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
दरम्यान, चारही बाजूने एक किलोमीटर परिसराला वीज अटकाव यंत्रणेचा फायदा होणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. यावेळी तांत्रिक सहायक नितीन एनापुरे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल विभागाचे अधिकारी उमेश काळे, पीटर लोबो, विजय पास्ते यासह बंदर विभागाचे अधिकारी, ठेकेदार एजन्सीचे प्रेमानंद मलये उपस्थित होते.
पावसाळी कालावधीत वीज कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात यावी. या सातत्याने होणाऱ्या मागणीची अखेर प्रशासनाकडून पूर्तता झाली आहे. वीज अटकाव यंत्रणेचा फायदा परिसरातील रहिवाशी, व्यापारी, किल्ले रहिवाशी, समुद्रातील नौका यांना होणार आहे. या परिसरात वीज कोसळल्यास ती या यंत्राच्या माध्यमातून खेचून जमिनीत जाणार आहे. त्यामुळे वीज कोसळून होणारे नुकसान टाळता येणार आहे.
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…