मालवण बंदर जेटी येथे वीज अटकाव यंत्रणा

Share

मालवण (वार्ताहर) : वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचे लोकार्पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

दरम्यान, चारही बाजूने एक किलोमीटर परिसराला वीज अटकाव यंत्रणेचा फायदा होणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. यावेळी तांत्रिक सहायक नितीन एनापुरे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल विभागाचे अधिकारी उमेश काळे, पीटर लोबो, विजय पास्ते यासह बंदर विभागाचे अधिकारी, ठेकेदार एजन्सीचे प्रेमानंद मलये उपस्थित होते.

पावसाळी कालावधीत वीज कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात यावी. या सातत्याने होणाऱ्या मागणीची अखेर प्रशासनाकडून पूर्तता झाली आहे. वीज अटकाव यंत्रणेचा फायदा परिसरातील रहिवाशी, व्यापारी, किल्ले रहिवाशी, समुद्रातील नौका यांना होणार आहे. या परिसरात वीज कोसळल्यास ती या यंत्राच्या माध्यमातून खेचून जमिनीत जाणार आहे. त्यामुळे वीज कोसळून होणारे नुकसान टाळता येणार आहे.

Recent Posts

घनदाट जंगलात ४८ तासांपासून सुरू आहे गोळीबार, सुरक्षा पथकाने अखेर घेरलंच

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…

4 minutes ago

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

20 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

45 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

48 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

1 hour ago

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

1 hour ago