'मविआ' काळात धान खरेदी घोटाळा

  116

भंडारा : मविआ काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल व ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


भंडारा दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, भंडाऱ्यात धानउत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांना बोनस मिळालाच पाहिजे. मात्र, मागील सरकारच्या काळात धानखरेदीत भ्रष्टाचार झाला. हा अनागोंदी कारभार दूर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचे धान खरेदी झालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांचेच धान खरेदी केले जाते, असे आता होऊ नये.


फडणवीस म्हणाले, मागील सरकारच्या काळात जे धान खरेदी झाल्याचे दाखवले गेले, ते धान आम्हाला सापडलेच नाही. ते कागदावरच आहे. हे धान कोणी गायब केले, त्यांना शोधावे लागेल. शेतकऱ्यांशी बेईमानी सहन करणार नाही. मागील सरकारच्या काळात अनेक बोगस संस्था, ज्यांच्याकडे धान साठवणीची जागाही नाही, त्यांनी धान खरेदी केल्याचे दाखवले गेले. शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्यानेच फायदे लाटले. हे आता रोखावे लागेल.


फडणवीस म्हणाले, लवकरच धान खरेदीसाठी बाजारात येणार आहे. त्यांच्या खरेदीची व्यवस्था करावी लागेल. शेतकऱ्यांना बोनस तसेच चांगली मदत मिळालीच पाहिजे. तसेच, धानखरेदीही पारदर्शक होईल, यासाठी प्रयत्न करू. तसेच, भंडारा हा पर्यटनाचा जिल्हा आहे व सिंचन खाते आता माझ्याकडे आहे. त्यामुळे गोसेखूर्द प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याचे सिंचन व पर्यटन वाढावे, यासाठी प्रयत्न करू.


फडणवीस म्हणाले, भंडारा जिल्ह्याच्या ज्या काही योजना प्रलंबित असतील त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. भंडाऱ्यात मेडीकल कॉजेच उभारण्याचा सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच त्याची कार्यवाही केली जाईल. राज्यात जेव्हा भाजपला इतरत्र यश मिळत नव्हते, तेव्ही भंडारा जिल्ह्याने भाजपला भरभरून दिले आहे. त्यामुळे पुन्हा हा जिल्हा आपल्या हाती घेण्यासाठी चांगले काम करु. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करू.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट ! पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

अंत्यसंस्काराची तयारी; तो चक्क जिवंत परतला घरी आणि एका क्षणात वातावरण बदलले

जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली

College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित

जळगाव बस अपघाताप्रकरणी आमदार जावळे संतापले, PWD अधिकाऱ्यांना दिला दम

जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा

CM Fadnavis podcast Maharashtra Dharma: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेचे पहिले चरण प्रदर्शित मुंबई: ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि