रायगडमधील पर्यटन क्षेत्राला अभूतपूर्व मंदी; काशिद, मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर शूकशूकाट

  30

नांदगाव-मुरुड (वार्ताहर) : पावसाळ्यानंतर रायगड अलिबागमधील अनेक समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. यंदा मात्र मुरुड, काशिदसह जंजिरा जलदुर्ग, पदमदुर्ग आदी ठिकाणी पर्यटक नसल्याने शूकशूकाट दिसत आहे. त्यामुळे येथील पर्यटक स्थळांवर अभूतपूर्व मंदी अनुभवायला मिळत आहे.


मुंबई-ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारे ओस पडले आहे. मुरूड, नांदगाव, काशीद, बारशिव, आगरदांडा, खोरा जेट्टी, राजपूरी जेट्टी वर पर्यटक नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. केवळ मुरूड तालुकाच नाही तर रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर देखील अशीच परिस्थिती असल्याने येथील पर्यटन क्षेत्रात नवरात्रौत्सवात अभूतपूर्व अशी मंदीची स्थिती इतक्या वर्षांत प्रथमच दिसून येत आहे.


काही व्यावसायिकांनी सांगितले की, नवरात्रोत्सव असला तरी एरव्ही पर्यटकांची वर्दळ सुरू असते. असा २०१७ पर्यंतचा (कोरोना काळ वगळता) अनुभव आहे. या वेळी एकदम वेगळी परिस्थिती आहे. गजबजलेल्या समुद्रकिनारी मोजकीच वाहने आणि पर्यटक दिसून येत आहे. निव्वळ पर्यटन व्यावसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक हवालदिल झाले आहे.


बहुतांश पर्यटक देवीच्या दर्शनाला

सध्या एकविरा, महालक्ष्मी, भवानी देवी अशा विविध देवस्थानामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना काळात भक्तांना देव- देवतांचे दर्शन दुर्लभ झाले होते. त्यामुळे यंदा सर्व देवस्थाने पूर्णपणे खुली झाल्याने बहुतांश पर्यटकांचे पाय देवींच्या मंदिराकडे वळल्याचे चित्र आहे. त्यातच सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत पावसाचा काळ वाढल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: "बाप तो बाप होता है" एकनाथ शिंदे यांनी लगावला नाना पटोले यांना टोला 

मुंबई: भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले आक्रमक

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच