नाशिक (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात लाच घेणाऱ्या कमर्चाऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच नाशिक शहर पोलिसांच्या दलातही लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. तर नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये आणखी एक लाचेचे प्रकरणे समोर आले आहे. २० हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण हद्दीतील मालेगाव पोलीस ठाणे हद्दीत लाचेची घटना घडली आहे. नशेच्या पदार्थांशी संबंधित असलेल्या व्यक्तीसह त्याच्या मित्रावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे आरोपावरून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार ताराचंद घुसर, पोलीस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील आणि सय्यद रशीद सय्यद रफिक उर्फ रशीद बाटा यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालेगाव येथे एक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीला वीस हजारांची लाच मागीतल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पकडले. तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र दि. ३ सप्टेबरला जेवण करुन घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थांशी संबधित आहेत. या कारणावरुन त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात चौकशीला नेण्यात आले होते. कायदेशीर कारवार्ई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्यांच्या मित्रासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आली. तडजोडअंती वीस हजार रुपये निश्चित करण्यात आले.
त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पथकाने सापळा रचला असता मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…