कांदिवलीत गोळीबार; १ ठार, ३ जखमी

  124

मुंबई : कांदिवलीत शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास लिंकरोडवर गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मोटर सायकल वरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला असून त्यात एक २३ वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गणेशोत्सव दरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.


कांदिवलीमधील लालजीपाडा परिसरात हा प्रकार घडला. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.


सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मयत तरुण अंकीत इंद्रमणी यादव हा लालजी पाडा येथील जय भारत कांदिवली या एसआरएच्या रिहॅब इमारतीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री सोनू पासवान उर्फ पासी नावाचा आरोपी त्याच्या अन्य साथीदारासोबत मोटर सायकलवरून आला आणि त्याने लिंकरोडवरील कल्पवृक्ष हाईट्स या इमारतीसमोर उभ्या असलेल्या चार तरुणांवर गोळीबार केला.


गोळीबारात अंकित यादव या तरुणाचा मृत्यू झाला. तर, अभिनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण जखमी झाले आहेत.


जखमींना उपचारासाठी शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.


यापैकी मयत तरुण अंकीत हा अतिगंभीर असल्याने त्याला अधिक उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलीस सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करत आहेत.

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक