मुंबई : कांदिवलीत शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास लिंकरोडवर गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मोटर सायकल वरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला असून त्यात एक २३ वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गणेशोत्सव दरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.
कांदिवलीमधील लालजीपाडा परिसरात हा प्रकार घडला. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मयत तरुण अंकीत इंद्रमणी यादव हा लालजी पाडा येथील जय भारत कांदिवली या एसआरएच्या रिहॅब इमारतीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री सोनू पासवान उर्फ पासी नावाचा आरोपी त्याच्या अन्य साथीदारासोबत मोटर सायकलवरून आला आणि त्याने लिंकरोडवरील कल्पवृक्ष हाईट्स या इमारतीसमोर उभ्या असलेल्या चार तरुणांवर गोळीबार केला.
गोळीबारात अंकित यादव या तरुणाचा मृत्यू झाला. तर, अभिनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
यापैकी मयत तरुण अंकीत हा अतिगंभीर असल्याने त्याला अधिक उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलीस सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करत आहेत.
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…
मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…
मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…
AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…
मालेगाव : नुकतेच सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी मुंबईतील सात ठिकाणी छापे…
मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.…