थापा पाठोपाठ आता मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात जाणार!

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंह थापा आमच्यासोबत आले. आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


गुलाबराव पाटील यांनी खोके घेतले म्हणता, पण आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा करणारा चंपासिंह थापाने काय केले? त्यांनी बाळासाहेबांच्या चरणी संपूर्ण आयुष्य घालवले, ते देखील उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आले आहेत. थापा आला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. थापा हे मातोश्रीवरील विश्वासू म्हणून ओळखले जायचे, बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला ते त्यांच्या सोबत असायचे त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवाच्या काळात मिलिंद नार्वेकरांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेतून बाहेर पडले असले, तरी शिंदेंनी नार्वेकरांसोबत संवाद कायम राखला आहे. तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना आमदार रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना चर्चेसाठी सूरतला पाठविले होते. यात विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक हे शिंदेंच्या सोबत गेले आहेत. त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर सहभागी होणार या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


गेली ३ महिने शिवसेनेतील रोज एक नेता शिंदे गटामध्ये जाताना दिसून येत आहे. कधी काळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय समजली जाणारी माणसे शिंदेंच्या गटात सहभागी होत असल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढत आहेत.

Comments
Add Comment

हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल

मुंबई : हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार

मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत

'पल्स' मुळे आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

मुंबई : सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे

द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी तासगाव व नाशिक येथे विशेष केंद्रांच्या मागणीचा सकारात्मक

मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात

बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू

पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर मिळणार न्याय

मुंबई : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांना