खंडणी वसुली करणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीला अटक

भाईंदर (वार्ताहर) : शासनाची बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री करत असल्याचे सांगून दमदाटी करून प्रकरण मिटविण्यासाठी २५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह चार जणांच्या तोतया पत्रकारांच्या टोळीला अटक केली आहे.


भाईंदर पश्चिमेला नवकार ट्रेडिंग नावाने वृषभ गांधी यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक महिला आणि तीन जण आले. आणि तुम्ही शासनाची बंदी असलेली प्लास्टिक वस्तू विकत आहेत, तुम्हाला दंड भरावा लागेल, असे सांगत दमदाटी केली. त्यातील महिलेने ११२ या टोल-फ्री क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना बोलावले.


पोलसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. सदर प्रकरण मिटविण्यासाठी टोळीतील धीरज दुबे आहे २५ हजारांची मागणी केली. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील, योगेश टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर व त्यांच्या पथकाने तोतया पत्रकार धीरज दुबे, अशोक कुमार मिश्रा, केसर उदय भानसिंह आणि कविता यादव यांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये