भाईंदर (वार्ताहर) : शासनाची बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री करत असल्याचे सांगून दमदाटी करून प्रकरण मिटविण्यासाठी २५ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह चार जणांच्या तोतया पत्रकारांच्या टोळीला अटक केली आहे.
भाईंदर पश्चिमेला नवकार ट्रेडिंग नावाने वृषभ गांधी यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक महिला आणि तीन जण आले. आणि तुम्ही शासनाची बंदी असलेली प्लास्टिक वस्तू विकत आहेत, तुम्हाला दंड भरावा लागेल, असे सांगत दमदाटी केली. त्यातील महिलेने ११२ या टोल-फ्री क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना बोलावले.
पोलसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. सदर प्रकरण मिटविण्यासाठी टोळीतील धीरज दुबे आहे २५ हजारांची मागणी केली. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील, योगेश टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर व त्यांच्या पथकाने तोतया पत्रकार धीरज दुबे, अशोक कुमार मिश्रा, केसर उदय भानसिंह आणि कविता यादव यांना अटक केली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…