टी-२० विश्वचषक विजेत्याला १३ कोटींचे बक्षीस; आयसीसीने जाहीर केली रक्कम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम आयसीसीने जाहीर केली आहे. अंतिम विजेत्या संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत एकूण ४५.६८ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.


आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. यूएईमध्ये झालेल्या गेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला एवढीच रक्कम दिली होती. उपविजेत्या न्यूझीलंडला ६.५ कोटी रुपये दिले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे या वेळी रुपयाच्या तुलनेत अधिक पैसे उपलब्ध होतील. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते.


उपांत्य फेरीतील पराभूत संघांना ३ कोटी २६ लाख २० हजार २२० रुपये देऊन सन्मानित केले जाईल. सुपर १२मधील प्रत्येक विजयासाठी ३२ लाख ६२ हजार २२ रुपये, सुपर १२ मधून बाहेर पडल्यावर ५७ लाख ०८ हजार १३ रु., पहिली फेरी जिंकल्यावर ३२ लाख ६२ हजार २२ रुपये दिले जातील. पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यावर ३२ लाख ६२ हजार २२ रुपये दिले जाणार आहेत.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात