नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम आयसीसीने जाहीर केली आहे. अंतिम विजेत्या संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत एकूण ४५.६८ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. यूएईमध्ये झालेल्या गेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला एवढीच रक्कम दिली होती. उपविजेत्या न्यूझीलंडला ६.५ कोटी रुपये दिले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे या वेळी रुपयाच्या तुलनेत अधिक पैसे उपलब्ध होतील. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
उपांत्य फेरीतील पराभूत संघांना ३ कोटी २६ लाख २० हजार २२० रुपये देऊन सन्मानित केले जाईल. सुपर १२मधील प्रत्येक विजयासाठी ३२ लाख ६२ हजार २२ रुपये, सुपर १२ मधून बाहेर पडल्यावर ५७ लाख ०८ हजार १३ रु., पहिली फेरी जिंकल्यावर ३२ लाख ६२ हजार २२ रुपये दिले जातील. पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यावर ३२ लाख ६२ हजार २२ रुपये दिले जाणार आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…