अखिलेश तिसऱ्यांदा बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

लखनऊ : समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी राम गोपाल यादव यांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांचे अभिनंदन करून पक्षासाठी लढत राहण्याची ग्वाही दिली.


अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. सर्वप्रथम १ जानेवारी २०१४ रोजी त्यांना पहिल्यांदाच मुलायमसिंह यादव यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.


अखिलेश यादव यांच्या आधी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. ऑक्टोबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद यादव कुटुंबाकडेच आहे. अखिलेश यांच्या आधी मुलायमसिंह यादव पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. याआधी बुधवारी सपाच्या प्रांतीय अधिवेशनात नरेश उत्तम पटेल यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Diwali Bonus Son papdi : 'बोनसऐवजी सोनपापडी' मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचा 'सूड'; संतप्त कामगारांनी मिठाईचे बॉक्स गेटबाहेर दिले फेकून, Video व्हायरल

सोनीपत : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह (Diwali Celebration) असताना, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून बोनसची

PM Modi On Trump Phone Call : ट्रम्प म्हणाले 'ट्रेड', तर मोदींनी दिले 'दहशतवादा'वर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत! फोन कॉलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

Chhath Puja Special Railway : छठ पूजेसाठी भारतीय रेल्वे सज्ज! प्रवाशांची विक्रमी गर्दी पाहता १२०००+ विशेष गाड्या धावणार; सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेच्या (Chhath Puja) सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी रेल्वे, बस किंवा विमानाने आपल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या