बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू

बोईसर (वार्ताहर) : प्रेम प्रकरणातून तरुणीवर भर रस्त्यात पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी टीमा हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये सदर तरुणाचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.


बोईसरमधील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या माथेफिरू तरुणाने स्नेहा मेहतो (रा. सरावली वय २१) या तरुणीची पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली. गोळी मारून पळून जात असताना, डी डेकोर कंपनीजवळ सीआयएसएफ च्या गाडीखाली आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला टीमा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादारम्यान त्याचा देखील मृत्यू झाला आहे.


बोईसर पोलिसांना या घटनेची खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने बोईसर परिसरात खळबळ माजली आहे. माथेफिरू तरुणाने प्रेम प्रकरणातून गोळी झाडून तरुणीची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे उपस्थित असून या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६