मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धोका कायम

  84

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार मान वर काढतात आणि पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा हे आजार कमी होतात. सध्या ‘स्वाईन फ्लू’चा धोका ओसरला असला, तरी मलेरिया आणि डेंग्यूची रुग्णसंख्या कायम आहे.


गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या कमी आहे. ऑगस्ट महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे १८९ रुग्ण होते. पण आता सप्टेंबरमध्ये २५ तारखेपर्यंत केवळ ७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ ओसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ७८७ रुग्ण होते, तर सप्टेंबरच्या २५ तारखेपर्यंत मलेरियाच्या ५७० रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले असून २५ दिवसांत १८० रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या १६९ रुग्णांची नोंद झाली होती.


सध्या ‘स्वाईन फ्लू’चा धोका ओसरला असला, तरी मलेरिया, डेंग्यूची रुग्णसंख्या कायम आहे. प्रशासनाने मलेरिया, डेंग्यूचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराबाबत लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)