गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणे गुन्हा आहे का?

  101

​​​​​​​बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर


मुंबई : उद्धव ठाकरे यांना नैराश्य आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आपण गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो, कष्टातून आई-वडिलांनी आपल्याला घडवले, याचा मला अभिमान वाटतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.


मुंबईत बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.


बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ठाकरे कुत्सितपणे माझ्या कुळाचा उल्लेख करतात, माझे आई-वडील शेतकरी आहेत. कष्टातून त्यांनी मला घडवलं, मला संघर्षाचा वारसा आहे. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं हा गुन्हा आहे का? असे थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.


पुढे ते म्हणाले की, माझ्या कुळाचा उद्धार करून ठाकरेंचे नैराश्य दूर होणार असेल, तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.


ठाकरे म्हणाले होते की, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? त्यांनी बाहेरचे उपरे एवढे घेतले की, बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

Comments
Add Comment

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

आंदोलनासाठी एक दिवसाच्या मुदतवाढीनंतर जरांगेची प्रतिक्रिया मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री