ठाणे (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात भिंतींच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान अपघातात दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला असून तिघेजण जखमी झाले आहेत. याठिकाणी असलेल्या रेल्वेच्या नव्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असतानाच शेजारी खेटून असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळल्याने दुर्घटनेत त्या ठिकाणी काम करणारे पाच मजूर गंभीर जखमी झाले. यामधील दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथे रेल्वेच्या संरक्षण भिंतीच काम सुरू आहे. बुधवारी (२१ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास हे काम सुरू असताना या भिंतीला खेटून असलेली जुनी भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत त्याठिकाणी काम करत असलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले. भिंत अंगावर कोसळल्याने हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देखील देण्यात आली. अग्निशमन विभागाने तत्काळ या ठिकाणी धाव घेतली पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांना जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर यामधील गंभीर जखमी झालेल्या मल्लेश चव्हाण आणि बंडू कुवासे या दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज वेडगुत्तवार या तीन मजुरांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचा काम सुरू असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.
नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar)…
बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…