रेल्वेची संरक्षक भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात भिंतींच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान अपघातात दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला असून तिघेजण जखमी झाले आहेत. याठिकाणी असलेल्या रेल्वेच्या नव्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असतानाच शेजारी खेटून असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळल्याने दुर्घटनेत त्या ठिकाणी काम करणारे पाच मजूर गंभीर जखमी झाले. यामधील दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथे रेल्वेच्या संरक्षण भिंतीच काम सुरू आहे. बुधवारी (२१ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास हे काम सुरू असताना या भिंतीला खेटून असलेली जुनी भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत त्याठिकाणी काम करत असलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले. भिंत अंगावर कोसळल्याने हे मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देखील देण्यात आली. अग्निशमन विभागाने तत्काळ या ठिकाणी धाव घेतली पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांना जवळच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


रुग्णालयात दाखल केल्यानंतर यामधील गंभीर जखमी झालेल्या मल्लेश चव्हाण आणि बंडू कुवासे या दोन मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज वेडगुत्तवार या तीन मजुरांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचा काम सुरू असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाण्याच्या मेट्रोचे डिसेंबरमध्ये होणार उद्घाटन, 'या' मार्गावर धावणार मेट्रो

ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे.

भिवंडीत शनिवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी (वार्ताहर) : जुनी भिवंडीला पाणीपुरवठा करणारी मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार

बदली आदेशानंतरही ठामपाचे १७० कर्मचारी त्याच विभागात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७०

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात

पाण्याचा काटकसरीने वापर करा : ठामपाचे आवाहन ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे पिसे, पांजरापूर येथील