हरमनप्रीतकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला आशिया चषक स्पर्धेकरिता भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.


ही स्पर्धा १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बांगलादेशमध्ये होणार आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकाचा किताब पटकावला आहे. यंदा सातव्यांदा भारतीय संघ जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी उत्सुक आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ २७ किंवा २८ सप्टेंबरपर्यंत बांगलादेशला पोहोचतील.


२०१२ पासून महिला आशिया कप स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी म्हणजेच २०१८मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत बांगलादेशने अंतिम विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम फेरीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. आतापर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषक स्पर्धेचा किताब जिंकला आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे