नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला आशिया चषक स्पर्धेकरिता भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ही स्पर्धा १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बांगलादेशमध्ये होणार आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकाचा किताब पटकावला आहे. यंदा सातव्यांदा भारतीय संघ जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी उत्सुक आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ २७ किंवा २८ सप्टेंबरपर्यंत बांगलादेशला पोहोचतील.
२०१२ पासून महिला आशिया कप स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी म्हणजेच २०१८मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत बांगलादेशने अंतिम विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम फेरीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. आतापर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषक स्पर्धेचा किताब जिंकला आहे.
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी…
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…