हरमनप्रीतकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला आशिया चषक स्पर्धेकरिता भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.


ही स्पर्धा १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बांगलादेशमध्ये होणार आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकाचा किताब पटकावला आहे. यंदा सातव्यांदा भारतीय संघ जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी उत्सुक आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ २७ किंवा २८ सप्टेंबरपर्यंत बांगलादेशला पोहोचतील.


२०१२ पासून महिला आशिया कप स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी म्हणजेच २०१८मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत बांगलादेशने अंतिम विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम फेरीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. आतापर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषक स्पर्धेचा किताब जिंकला आहे.

Comments
Add Comment

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड ; टी-२० मालिका आजपासून रंगणार

नवी दिल्ली  : न्यूझीलंड शनिवारपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे,

पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन

विराट आणि रोहित २०२७ विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील - ट्रॅव्हिस हेड

कॅनबेरा : भारतीय वेळेनुसार रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेड आणि

टीम इंडियाच्या 'अपोलो टायर्स' जर्सीचा लूक समोर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पर्थमध्ये फोटोशूट

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या