मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडप उभारणीसाठी रस्ते, पदपथ आणि उद्यानात खड्डे खोदले होते. उत्सव झाल्यानंतर मंडळाकडून हे खड्डे बुजवण्यात आले नव्हते. यासाठी पालिकेने मंडळांना ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडप उभारणीसाठी रस्ते, पदपथ आणि उद्यानात १८३ खड्डे खोदले होते. उत्सव झाल्यानंतर मंडळाकडून हे खड्डे बुजवण्यात आले नव्हते. यासाठी पालिकेने मंडळांना ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मागवलेल्या माहितीमधून ही माहिती समोर आली आहे.
मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव साजरा करण्यासाठी मोठे मंडप उभारले जातात. बहुसंख्य मंडप रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत उभारले जातात. मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदावे लागतात. असेच खड्डे लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाकडून खोदण्यात आले होते. मंडप, सुरक्षा मार्ग यासाठी मंडळाकडून खड्डे खोदण्यात आले होते. गणेशोत्सव साजरा झाल्यावर मंडळाने हे खड्डे बुजवणे गरजेचे होते. मात्र मंडळाकडून खड्डे बुजवले नसल्याने पालिकेच्या भायखळा येथील ई विभाग कार्यालयाकडून दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी दिली.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने फुटपाथवर संरक्षण मार्गिका उभारली होती. त्यासाठी बेकायदेशीपणे फुटपाथवर ५३ आणि रस्त्यावर १५० असे एकूण १८३ खड्डे खोदले आहेत. या खड्ड्यांसाठी पालिकेच्या नियमानुसार प्रति खड्डा २ हजार रुपये या प्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड पालिकेच्या ई विभाग कार्यालयात भरावा असे मंडळाला ७ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…