राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

  96

मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुक होणार आहे. यासोबत आजचे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने निवडणुकांच्या निकालाबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.


ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यामधील सर्वाधिक म्हणजे १३९ तर यवतमाळ जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. आज सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत या निवडणुकीसाठा मतदान करता येणार आहे. या निवडणुकीचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.


विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:


नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५. धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- ०२. बुलढाणा: जळगाव (जामोद)- ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा ०१, चिखली- ०३ व लोणार- ०२. अकोला: अकोट- ०७ व बाळापूर ०१. वाशीम : कारंजा- ०४. अमरावती धारणी- ०१, तिवसा- ०४, अमरावती- ०१ व चांदुर रेल्वे- ०१. यवतमाळ : बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३, महागाव - ०१. आर्णी- ०४, घाटंजी - ०६, केळापूर २५. राळेगाव- ११, मोरेगाव- ११ व झरी जामणी- ०८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१. मुदखेड - ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५, व देगलूर - ०१. हिंगोली : (औंढा नागनाथ)- ०६. परभणी : जिंतूर- ०१ व पालम - ०४. नाशिक : कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक १७. पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ०५ व भोर- ०२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर ०१. सातारा: वाई - ०१ व सातारा- ०८. व कोल्हापूर : कागल- ०१.

Comments
Add Comment

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता.