नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  148

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.


नाशिक शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर शेतकऱ्यांनादेखील मोठे नुकसान होण्याची भीती आता सतवू लागली आहे. गुरुवारी रात्री गोदावरी नदीत सात हजार क्युसेस पाणी सोडण्यात आल्यामुळे रात्रभर शहरात व धरण परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुख्यतः पितृपक्षामुळे धार्मिक कारणासाठी आलेल्या 'भाविक आणि पुरोहितांची मोठी गैरसोय झाली आहे.


यंदा पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना नाशिक शहरातही पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गुरुवारी धरण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे रात्री आठ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत सुमारे सात हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीच्या काठी असलेली बरीच लहान -मोठी मंदिरे सध्या पाण्याखाली गेली आहेत.


नाशिकच्या पुराचे परिमाण ठरणारा दुतोंड्या मारुतीसुद्धा कमरेपर्यंत पाण्याखाली गेला आहे. त्यातच रात्रभर शहरात आणि धरण परिसरात संततधार पाऊस झाल्याने आज शुक्रवारी पुन्हा या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या रामसेतू पुलाला पाणी लागले असल्यामुळे गोदावरी नदीच्या आजूबाजूला पाणीच पाणी झाले आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या पितृपक्षामुळे गंगेवर शहरातील व बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी झाली असल्याने या पाण्यामुळे सर्वांचेच हाल होताना दिसत आहे. तर नदीकाठी असलेल्या व्यापाऱ्यांचे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

Comments
Add Comment

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या