आयसीसी क्रमवारीत विराट १५व्या स्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेतील स्फोटक फलंदाजी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी लाभदायक ठरली आहे. आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत विराटने मोठी झेप घेतली असून तो थेट १५ व्या स्थानी पोहचला आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगालाही लाभ झाला असून टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत तो सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.


टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर आहे, तर कर्णधार रोहित शर्मा १४व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वल स्थानी असून कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत भुवनेश्वर कुमारचे एक स्थान कमी झाले असून तो सातव्या स्थानावर घसरला आहे.


कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील ७१वे शतक झळकावले. त्याचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. त्याने आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली असून तो १५व्या स्थानावर पोहचला आहे. आशिया चषक स्पर्धेपूर्वी विराट कोहली २९व्या स्थानावर होता.

Comments
Add Comment

अखेर तो गोड क्षण आलाच! आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधना अव्वल स्थानावर

नवी दिल्ली: भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत पलाश मुच्छलसोबत लग्न

आयपीएल मिनी लिलावात कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी

IPL Auction 2026 LIVE : आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूला खरेदी केलं आहे ते पाहूया CSK : 

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला