गांगुली, जय शहा पदावर कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला घटनादुरुस्ती करण्यास मंगळवारी परवानगी दिली. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे त्यांच्या पदावर कायम राहतील. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने त्यांचा कार्यकाळ ६ वर्षांपर्यंत असू शकतो. कुलिंग ऑफ पीरियडबाबत मंगळवारी सुप्रीम कोर्टाने मवाळ भूमिका घेतली होती.


२०१९ मध्ये बीसीसीआयच्या नवीन अधिकाऱ्यांची निवड झाली होती. यामध्ये अध्यक्षपदी सौरव गांगुली, सचिवपदी जय शहा, खजिनदार अरुण धुमाळ आणि सहसचिवपदी जयेश जॉर्ज यांची निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी बीसीसीआयने कुलिंग ऑफ पीरियडबाबत लोढा समितीच्या शिफारशींविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.


लोढा समितीच्या शिफारशींनुसार, २०१८ मध्ये अस्तित्वात आलेल्या बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणताही पदाधिकारी ६ वर्षे सलग दोन टर्म या पदावर असेल, तर त्याला ३ वर्षांसाठी कुलिंग ऑफ पिरियडमध्ये जावे लागेल. त्यानुसार, पदाधिकारी सलग ६ वर्षे स्टेट बॉडी किंवा बीसीसीआयमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतरही त्याला ३ वर्षांचा गॅप घ्यावा लागेल. घटनेनुसार ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदाधिकारी कोणतेही पद भूषविण्यास व निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो.


या प्रकरणात, बीसीसीआयचे म्हणणे आहे की, सदस्याने एकाच ठिकाणी सलग सहा वर्षे पद भूषवल्यानंतर कुलिंग ऑफ पीरियड आला पाहिजे. स्टेट फेडरेशन किंवा बीसीसीआय या दोघांना मिळून नाही. सध्याच्या घटनेनुसार, जर पदाधिकारी स्टेट असोसिएशन किंवा बीसीसीआय किंवा या दोन्हीमध्ये सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असेल तर त्याला कुलिंग-ऑफ पिरियडमध्ये जावे लागेल.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा