माजी क्रिकेटपटू जसवंत बक्रानिया यांचे निधन

Share

बंगळुरू (वृत्तसंस्था) : भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज जसवंत बक्रानिया यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. बक्रानिया यांच्या निधनानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दु:ख व्यक्त करताना लिहिले आहे की, “जसवंतभाईंच्या दुःखद निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येकाकडून त्यांचे भाऊ अश्विन बक्रानिया आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला सांत्वन. जसवंतभाईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

बक्रोनिया यांचा जन्म पूर्ण आफ्रिकेच्या झिंझा शहरात झाला होता. मात्र, काही काळानंतर बक्रोनिया यांचे कुटुंब राजकोटला स्थानिक झाले. त्यानंतर बक्रानिया यांनी १९७० ते १९८३ दरम्यान सौराष्ट्र आणि राजकोट संघांकडून क्रिकेट खेळले. या दोन्ही संघात त्यांनी यष्टीरक्षक फलंदाजांची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५६ अ श्रेणी क्रिकेट सामन्यात ३२.३४ च्या सरासरीने ३ हजार १३७ धावा केल्या. या दरम्यान त्यांच्या बॅटमधून पाच शतक झळकली आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बक्रोनिया यांनी ५१ झेल आणि १२ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ट्विटरच्या माध्यमातून जसवंत बक्रानिया यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि गुजरात संघाकडून क्रिकेट खेळले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

Recent Posts

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

11 seconds ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

37 seconds ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

9 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

19 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

28 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

37 minutes ago