सरकारी वकिलांसाठी मराठीत परीक्षा घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

  76

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याची भाषा' असलेल्या 'मराठी'चा प्रचार करण्यासाठी आणि भविष्यात सरकारी वकिलांच्या पदाच्या परीक्षाही इंग्रजीशिवाय मराठीतूनच घ्याव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकारला आपले धोरण लागू करण्यासाठी गंभीर राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.


महाराष्ट्रात सरकारी वकील भरती परीक्षा मराठीतून घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपले धोरण गांभीर्याने राबवावे, असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर.एन.लड्ढा यांच्या खंडपीठाने प्रताप जाधव यांच्या याचिकेसंदर्भात बोलताना हे निर्देश दिले आहेत. तसेच सरकारी वकिलांच्या पदांसाठी होणारी परीक्षा इंग्रजीऐवजी मराठीतून घेण्याचा आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.


सरकारी वकील भरती परीक्षा ११ सप्टेंबर २०२२ ला झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या परीक्षेसंदर्भात आदेश देणे शक्य झाले नाही. परंतु, सरकारी वकिलांच्या पुढील परीक्षा मराठी भाषेत घेतल्या जातील यासंबंधीची खात्री महाराष्ट्र सरकार करेल असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिलेल्या आदेशामुळे राज्याची राज्यभाषा असलेल्या मराठीच्या संवर्धनासाठी मदत होईल असेही न्यायालयाने यावेळी सांगितले आहे.


आपण शाळेत मराठीत शिकलो न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग यांच्या न्यायालयासमोरील कामकाज मुख्यत्वे मराठी भाषेतच चालते. महाराष्ट्रात मराठी ही स्थानिक भाषा आहे. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, महाराष्ट्र सरकारने या विषयावर गंभीर व्हायला हवे होते.

Comments
Add Comment

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र

जरांगे आरक्षण मिळेपर्यंत पाणी पण बंद करणार

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत