नवी मुंबईत ३८ टन ओल्या निर्माल्यावर होणार नैसर्गिक खत निर्मिती प्रक्रिया

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईत गणेशोत्सवात जमा झालेल्या ३८ टन ओल्या निर्माल्यावर नैसर्गिक खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे. अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्रीगणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत १५ हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे १३४ कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद दिला.


श्रीगणेशोत्सवातील पाच विसर्जन दिवसांमध्ये २२ नैसर्गिक व १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात ३८.७९५ टन ओले निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र ४६ निर्माल्य वाहतूक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवात श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी येणाऱ्या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.


अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनादिवशी ६ टन, पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी ५ टन, गौरींसह सहाव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी १२.५७० टन, सात दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी ४.५७५ टन तसेच दहाव्या अनंतचतुदशीच्या विसर्जनाप्रसंगी ९.८८५ टन अशाप्रकारे पाच विसर्जनदिनी एकूण ३८.७९५ टन निर्माल्य जमा झाले. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी ४० स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची