Categories: पालघर

वसई-विरार महापालिका पालापाचोळ्यापासून करणार खतनिर्मिती!

Share

विरार (प्रतिनिधी) : केंद्र शासन स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या अनुषंगाने राज्यात स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंमलबजावणी सुरू असून; घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ मधील नियम १५ पी अंतर्गत उद्यानांत निर्माण होत असलेल्या पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक केल्याने वसई-विरार महापलिकेने उद्यानांतील पालापाचोळा व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या खतनिर्मितीकरता पालिका फोल्डेबल कम्पोस्ट बॅग खरेदी करणार असून याकरता तीन लाख रुपये खर्च करणार आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात १५२ उद्याने आहेत. त्यात गरजेनुसार फोल्डेबल कम्पोस्ट बॅग ठेवून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रति बॅगकरता पालिकेने दोन हजार रुपये इतका दर निश्चित केलेला आहे. त्यानुसार १५० कम्पोस्ट बॅगकरता पालिकेला अंदाजित तीन लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या टूलकिटमध्ये नमूद केल्याप्रमाणे या कामाकरता २५० गुण असल्याने महापालिकेच्या मानांकन वाढीसाठी त्याची मदत होणार आहे. त्यासाठी हा खतनिर्मिती प्रकल्प पालिकेला आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

Recent Posts

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

4 minutes ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

11 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

21 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

26 minutes ago

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

52 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

1 hour ago