वसई-विरार महापालिका पालापाचोळ्यापासून करणार खतनिर्मिती!

विरार (प्रतिनिधी) : केंद्र शासन स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या अनुषंगाने राज्यात स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंमलबजावणी सुरू असून; घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ मधील नियम १५ पी अंतर्गत उद्यानांत निर्माण होत असलेल्या पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक केल्याने वसई-विरार महापलिकेने उद्यानांतील पालापाचोळा व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.


या खतनिर्मितीकरता पालिका फोल्डेबल कम्पोस्ट बॅग खरेदी करणार असून याकरता तीन लाख रुपये खर्च करणार आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात १५२ उद्याने आहेत. त्यात गरजेनुसार फोल्डेबल कम्पोस्ट बॅग ठेवून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रति बॅगकरता पालिकेने दोन हजार रुपये इतका दर निश्चित केलेला आहे. त्यानुसार १५० कम्पोस्ट बॅगकरता पालिकेला अंदाजित तीन लाख रुपये इतका खर्च येणार आहे.


स्वच्छ सर्वेक्षणाच्या टूलकिटमध्ये नमूद केल्याप्रमाणे या कामाकरता २५० गुण असल्याने महापालिकेच्या मानांकन वाढीसाठी त्याची मदत होणार आहे. त्यासाठी हा खतनिर्मिती प्रकल्प पालिकेला आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार