वसई-विरार महापालिका पालापाचोळ्यापासून करणार खतनिर्मिती!

विरार (प्रतिनिधी) : केंद्र शासन स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या अनुषंगाने राज्यात स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंमलबजावणी सुरू असून; घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ मधील नियम १५ पी अंतर्गत उद्यानांत निर्माण होत असलेल्या पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक केल्याने वसई-विरार महापलिकेने उद्यानांतील पालापाचोळा व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.


या खतनिर्मितीकरता पालिका फोल्डेबल कम्पोस्ट बॅग खरेदी करणार असून याकरता तीन लाख रुपये खर्च करणार आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात १५२ उद्याने आहेत. त्यात गरजेनुसार फोल्डेबल कम्पोस्ट बॅग ठेवून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रति बॅगकरता पालिकेने दोन हजार रुपये इतका दर निश्चित केलेला आहे. त्यानुसार १५० कम्पोस्ट बॅगकरता पालिकेला अंदाजित तीन लाख रुपये इतका खर्च येणार आहे.


स्वच्छ सर्वेक्षणाच्या टूलकिटमध्ये नमूद केल्याप्रमाणे या कामाकरता २५० गुण असल्याने महापालिकेच्या मानांकन वाढीसाठी त्याची मदत होणार आहे. त्यासाठी हा खतनिर्मिती प्रकल्प पालिकेला आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

Comments
Add Comment

वाढवण बंदरातील रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर कोणतीही गदा येऊ नये,

उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील

५८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या

वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील

विक्रमगडमध्ये आदिवासी सेवा मंडळाच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्याची आत्महत्या

विक्रमगड  : विक्रमगड तालुक्यातील जव्हार आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ‘माण’ येथील आदिवासी सेवा मंडळाच्या

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

पालघर : मुंबईजवळील पालघर परिसरात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ‘पुण्याला

डहाणूत थेट, तर तीन ठिकाणी तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार आले आमने-सामने गणेश पाटील पालघर/ वाडा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर