मुंबई : विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. ऐन गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड दैना उडाली आहे. सखल भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. लोकल सेवाही विस्कळीत झाल्याने कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील उपनगरीय वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
पूर्व उपनगर परिसरात पडत असलेल्या पावसाचा फटका हा सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले. भांडुपमधील कोकण नगर, सह्याद्री नगर, बुद्ध नगर, पठाण तबेला या परिसरात जलमय स्थिती झाली. या परिसरातील रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पामुळे परिसरात नाला रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर तसेच थेट घरांमध्ये शिरले आहे.
तर सलग दुसऱ्या दिवशीही ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. उद्या अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या तयारीत अडथळे येण्याची शक्यता आहे.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…