मुंबई : अपघातांना आळा घालण्यासाठी आता कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांना देखील सीट बेल्ट लावणे बंधनकारक असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या घोषणेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘कारमध्ये सीट बेल्ट लावा आणि रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार व अधिका-यांना रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करा,’ असे ट्वीट करत गडकरींना टोला लगावला आहे. हे ट्वीट करताना त्यांनी #आता_सहन_नाही_होत असा हॅशटॅग वापरला आहे.
आमदार राजू पाटील यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये लिहीले आहे की, “सुरक्षेच्या दृष्टीने जसे सीटबेल्ट बांधणे अनिवार्य केले आहे, तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय!” महत्त्वाचे म्हणजे, राजू पाटील यांनी हे ट्वीट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरींना टॅग केले आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. या नंतर सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…