पंतप्रधान मोदी उद्या करणार सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता इंडिया गेट येथे हा कार्यक्रम होणार आहे.

सर्वप्रथम, इंडिया गेटच्या मागे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अनेक दशकांपूर्वी राजा पाचवा जॉर्ज यांचा पुतळा ज्या छताखाली ठेवण्यात आला होता, तिथे सुभाषचंद्रा बोस यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यानंतर पीएम मोदी इंडिया गेटजवळ बांधलेल्या स्टेप्ड प्लाझाची पाहणी करतील. त्यानंतर पंतप्रधान कॅनॉल ब्रिजकडे जातील, तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. यानंतर, पंतप्रधान एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी पंतप्रधानांचे मंचावर स्वागत करतील. नेताजी बोस यांच्याविषयी दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. रात्री ८ वाजता पंतप्रधानांचे भाषण होणार आहे. रात्री ८.३० वाजता नेताजी बोस यांच्या जीवनावर आधारित ड्रोन शो सादर करण्यात येईल.

विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत विस्तारलेला सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू ८ सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, लहान मुलांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि नवी दिल्लीतील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ठराविक रस्त्यांवर सामान्य वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

13 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

38 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago