अमरावती : अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. याआधीही अशा प्रकारच्या घटना अमरावतीमध्ये झालेल्या आहेत. तसेच लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवनीत राणा यांनी आरोप करताना म्हटले की, अमरावतीची बदनामी का होत आहे. १९ वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणले आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबत उत्तरं दिली जात नाहीत. त्या मुलाच्या परिवाराला येथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल, असेही राणा म्हणाल्या. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम दिला असल्याचे राणा म्हणाल्या. या मुलांची एक टोळी आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना मुलीच्या पालकांनी सांगितले की, माझी मुलगी १२.३० वाजता बॅंकेत गेली. मात्र तिचा फोन नंतर बंद झाला. आमच्या घरी तो मुलगा कधीच आलेला नाही, असे या मुलीच्या पालकांनी सांगितले.
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, धारणी आणि अमरावती अशी दोन प्रकरणं आहेत. धारणीच्या मुलीला हैदराबादला नेण्यात आले आहे. त्या मुलीने देखील फोन करुन मला अमरावतीला यायचे आहे. धारणी आणि अमरावतीच्या पोलिसांना मी विनंती केली होती की, त्या मुलींना शोधून सोडवून आणा. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये जेवढं गांभीर्य दाखवायला हवे होते, तेवढे गांभीर्य दाखवलेले नाही. धारणीमध्ये वीस प्रकरणे अशाच प्रकारची झाली आहेत तर अमरावतीमध्ये चार प्रकरणे झाली आहेत. या मुलींचे पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत, असे खासदार बोंडे यांनी सांगितले.
पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…