मुंबई : राज्याच्या विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. थोडीफार उघडीप घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार बरसणार आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय होणार आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून आता अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईसह ठाणे परिसारत चांगली पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लातूर, बीड, नाशिक, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातही पाऊस पडला आहे.
लांबलेल्या पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळे पिकांनी जीवदान मिळाले आहे. दरम्यान, आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…