आरबीआयकडून ५ सहकारी बँकावर कारवाई

  100

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँक ही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवते. बँकेकडून निर्देशांचे पालन नाही केले तर कारवाई करते. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकने पाच सहकारी बँकांनी निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्या बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. या सहकारी बँकेत ठाणे भारत सहकारी बँकेचा देखील सामावेश आहे.


भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘कर्नाटक राज्य सहकारी एपेक्स बँक लिमिटेड’वर हाऊसिंग फायनान्सच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे २५ लाखांचा दंड ठोठावला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याआधीही आरबीआईने निर्देशांचे पालन न केल्यामुळे आठ सहकारी बँकावर दंडात्मक कारवाई केली होती.


भारतीय रिझर्व्ह बँकेने एका निवदेनात म्हटले आहे की, ‘ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड’ बँकेला आरबीआयने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारात ग्राहकांच्या हिताबाबत वेळीच लक्ष न दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँक, झांसी या बँकेला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. 'सुपरवायजरी अॅक्शन फ्रेमवर्क एसएएफ'च्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.


एक्सपोजर नियम आणि वैधानिक, यूसीबीअंतर्गत इतर निर्बंधाअंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निकोलनस कॉ-ऑपरेटिव्ह टाउन बँक, तंजावुर जिल्हा, तमिळनाडू सदर बँकेवर आयबीआयने २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षण आणि जागरूकता निधीशी संबंधित नियामांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरी सहकारी बँक, राउरकेला येथील बँकेवर १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल दंड आकारला आहे.

Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध