मुंबई (वार्ताहर) : गणपती विसर्जन २०२२ निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे दि. १०.९.२०२२ रोजी (९/१०.९.२०२२ मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
मेन लाईन – अप स्पेशल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून मध्यरात्री ००.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ०१.३० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ०२.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून मध्यरात्री ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.०० वाजता पोहोचेल.
मुख्य लाईन – डाउन स्पेशल : कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ०३.१० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे पहाटे ०३.३० वाजता पोहोचेल. कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे सकाळी ४.५५ वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – अप स्पेशल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ०२.२० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून मध्यरात्री ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.०५ वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन – डाउन स्पेशल : पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री ०२.५० वाजता पोहोचेल. पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.
मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी…
'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची…
नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर…
उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते.…
इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान…
उत्तर प्रदेश: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशातील सर्व…