समुद्रात वादळी स्थिती; परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला

देवगड (प्रतिनिधी) : पश्चिम कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला आले आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्यावर पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नौकानी देवगड बंदराकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुजरात राज्यातील सुमारे ३० नौका देवगड बंदरात मुक्कामाला आले आहेत त्याचपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच


तमिळनाडूमधील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत.बंदर अधिकारी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा वादळ परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर हे सर्वात सुरक्षित बंदर मानले जाते.


नैसर्गिक रचनेमुळे समुद्रात येणाऱ्या वादळाचा थेट परिणाम बंदरातील नौकांना जाणवत नाही. यासाठी अनेक मच्छिमार नौकांनी देवगड बंदरात आश्रय घेतला असल्याने देवगड बंदर नौकांनी फुलून गेले. आपत्कालीन स्थितीमध्ये सर्व नौका देवगड बंदराचा आश्रय घेतात.मात्र सध्यातरी फक्त कोकणातीलच बोटींनी देवगड बंदरात आश्रय घेतला आहे

Comments
Add Comment

मान्सूनची मस्ती: देवांची मुंबईत गडगडाटासह दिवाळी! मुंबई, ठाण्यात दिवाळीत मिम्सचा पाऊस

मुंबई: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने दिवाळीतील फटाक्यांच्या

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर पावसाचे पाणी; विजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांमध्ये 'अवकाळी'

मुंबई: दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईसह महाराष्ट्रभरात

Stock Market Muhurat closing: मुहुरत ट्रेडिंगला तेजीचीच साथ मात्र गुंतवणूकदारांच्या सावधगिरीने बँक निफ्टी घसरला ! सेन्सेक्स ६२.९७ व निफ्टी २५.४५ अंकाने उसळला !

मोहित सोमण:आदल्या दिवशीची शेअर बाजारातील रॅली मुहुरत ट्रेडिंग (समावत २०८२) दरम्यान अबाधित ठेवली आहे. अर्थात शेअर

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

Pratap Sarnaik : अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराला मिळाला आधार; सरनाईक कुटुंबाकडून शेतकऱ्यांना '१०१ गोवंश' भेट!

मुंबई : यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः धाराशिव