समुद्रात वादळी स्थिती; परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला

देवगड (प्रतिनिधी) : पश्चिम कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला आले आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्यावर पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नौकानी देवगड बंदराकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुजरात राज्यातील सुमारे ३० नौका देवगड बंदरात मुक्कामाला आले आहेत त्याचपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच


तमिळनाडूमधील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत.बंदर अधिकारी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा वादळ परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर हे सर्वात सुरक्षित बंदर मानले जाते.


नैसर्गिक रचनेमुळे समुद्रात येणाऱ्या वादळाचा थेट परिणाम बंदरातील नौकांना जाणवत नाही. यासाठी अनेक मच्छिमार नौकांनी देवगड बंदरात आश्रय घेतला असल्याने देवगड बंदर नौकांनी फुलून गेले. आपत्कालीन स्थितीमध्ये सर्व नौका देवगड बंदराचा आश्रय घेतात.मात्र सध्यातरी फक्त कोकणातीलच बोटींनी देवगड बंदरात आश्रय घेतला आहे

Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या चारही नगराध्यक्ष पदांवर राणे कुटुंबाचे वर्चस्व कायम, उबाठा भुईसपाट

संतोष राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार नगर परिषद व लांजा, देवरूख व गुहागर या तीन नगर

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची दादागिरी

पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ पैकी १०

अहिल्यानगरवर महायुतीचा झेंडा

सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या ऐतिहासिक अहिल्यानगर

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची सरशी

धनंजय बोडके नाशिक जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या नगरपरिषदांमध्ये जाहीर झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निकालात

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने