शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी उद्धव बेईमान!

Share

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभे आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढून शिवसेना वाढवली. परंतु त्यांच्या मुलाने काय केले? मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांच्या मांडीवर बसले आणि सोनिया गांधींच्या पायाशी बसले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचा गंभार आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळेच बाळासाहेबांची शिवसेना वाचली, असा गौप्यस्फोटही रामदास कदम यांनी केला.

पक्ष फुटला, संपला तरी चालेल, परंतु शरद पवारांना सोडायचे नाही. अजितदादा सकाळी ७ पासून मंत्रालयात बसायचे. तो माणूस मास्टरमाईंड आहे. शरद पवार ६ वाजल्यापासून काम सुरू करतात आणि त्यांनी मंत्रालयात बसून राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवायचा. त्यासाठी १०० आमदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीने अडीच वर्षापासून प्रयत्न सुरू केले. हे सर्व आमच्या आमदारांनी अनेकदा सांगितले. पण उद्धव ठाकरे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे हे सगळे आमदार वैतागून भाजपात जाणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळेच ते थांबल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे मराठेद्वेष्टे आहेत. केवळ मराठा नेत्यांचा ते वापर करतात आणि नंतर अडगळीत फेकतात. मराठा माणूस मोठा झालेला त्यांना आवडत नाही. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. ते सामनातून अनेकदा निदर्शनास आले. चार-पाच बडवे सोडले तर बाकीच्या कोणाचेही ते ऐकत नसल्याने आज ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळे आता जिथे जिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सभा घेतील. तिथे तिथे जाऊन रामदास कदम सभा घेणार. खरे गद्दार कोण, खरे खोकेवाले कोण हे वास्तव लोकांना सांगणार. जिल्हा जिल्ह्यात जाणार. मला ३ वर्ष बोलू दिले नाही. हम करे सो कायदा ही हुकुमशाही, मी मालक बाकी नोकर असा कारभार झाला. बाळासाहेब असताना सगळ्या नेत्यांशी बोलायचे. चर्चा करायचे, त्यानंतर निर्णय घ्यायचे. परंतु आता ते राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

गुहागरमध्ये माझा पराभव करण्यासाठी मातोश्रीतून शिवसेना नेत्याला आदेश देण्यात आले होते. वेळ येईल तेव्हा नाव घेईन. भूकंप होईल. रामदास कदमांना पाडा. मी गाफील राहिलो. शेवटच्या २ दिवसात मला कळालं. मराठ्यांना मोठे होऊ द्यायचं नाही. माझा पराभव झाला. परंतु शिवसेनाप्रमुखांनी मला विधान परिषदेची संधी दिली. त्यांच्या भाषणापेक्षा माझ्या भाषणाला टाळ्या मिळतात. स्वत:ला असुरक्षित समजतात, असा आरोप रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला.

माझ्या मुलाला जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. राष्ट्रवादीच्या विरोधात तो शिवसेनेकडून निवडून आला. परंतु या मतदारसंघातील भगवा झेंडा खाली उतरवण्याचे काम तुम्ही केले. गद्दार तुम्हीच आहात. अनिल परबला पाठवून दापोलीची नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घातली. शरद पवार सांगणार ते हे ऐकणार. उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त ३ वेळा मंत्रालयात आले, ही नोंद गिनीज बुकात झाली. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख आहे. पण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. याची पोलखोल जिल्हा जिल्ह्यात सभा घेऊन रामदास कदम हे करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Recent Posts

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

52 minutes ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

1 hour ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

2 hours ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

3 hours ago

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…

3 hours ago

Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…

4 hours ago