आता रायगड पोलिसांकडेही ‘सायबर क्राईम पोर्टल’

सुभाष म्हात्रे


अलिबाग : ऑनलाइन व्यवहार वाढत असतानाच फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेकांना याविरोधात तक्रार कुठे करायची हेदेखील माहिती नसते. वेळ निघून गेल्यानंतर पोलीसही काहीच करू शकत नाही. यासाठी यावर मात करण्यासाठी गृहविभागाने सायबर क्राइम पोर्टलची निर्मिती केली आहे. सुरुवातीच्या तासातच पोर्टलवर तक्रार केल्यास ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालता येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


मागील महिन्यातच ही सुविधा रायगड पोलिसांकडे उपलब्ध झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे पोलिसांनाही सोपे झाले आहे. अनेक वेळा ओटीपी नंबर दिल्यानंतर, एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन फसवणूक होते. काहीवेळा आमिषे दाखविली जातात आणि त्यातून फसवणूक होते. यातून सहज आणि तातडीने तक्रार नोंद होईल, या उद्देशाने शासनाने एक पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलसाठी शासनाने सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असल्याने कोणत्याही बँकेतील पैसे काही तासातच परत आपल्या खात्याच परत वळते होतात. त्यावर तातडीने माहिती भरल्यास फसवणूक झालेले पैसे ‘ब्लॉक’ करून ते पुन्हा मूळ बँक खात्यावर जमा करण्याची तरतूद केली आहे.


सायबर गुन्हेगारी हे पोलिसांसमोरच नव्हे, तर सर्व नागरिक, ग्राहकांसमोरही आव्हान आहे. फसवणूक झाल्यास पैसे परत मिळतील याची खात्री नसते. ग्रामीण भागातील नागरिकही या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. अनेक वेळा तक्रार करण्यात उशीर होत असतो, त्याच दरम्यान ऑनलाइन व्यवहार पूर्ण होत असल्याने पोलिसांनाही काहीही करता येत नाही. याचमुळे रायगड पोलिसांच्या सायबर सेलकडे मागील सहा महिन्यांत ३० सायबर क्राइमचे गुन्हे पडून आहेत. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभने दाखवित काही क्षणात बँक अकाऊंटचा बॅलेन्स ‘झिरो’ करतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होतो. सायबर गुन्हेगार दुसऱ्या राज्यात बसून हे गुन्हे करीत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचता येत नाही. यामुळे कमी वेळेत साध्या व सोप्या पद्धतीने तक्रार करण्याची पद्धत गृहविभागाने सुरू केली आहे.


पोर्टलवर तक्रारीची सोपी पद्धत


पोर्टलवर तक्रार फसवणूक झाल्यानंतर तातडीने करावी. ज्यावेळी फसवणूक झाली, त्याच क्षणाला पोर्टलवर जावे. त्याठिकाणी तारीख, वेळ आणि ट्रान्झेक्शन आयडी द्यावे किंवा ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल आला होता. त्याचा नंबर देणे गरजेचे आहे. तक्रार नोंद झाल्यास त्या क्षणाला तुमचे पैसे ज्या ठिकाणी (ज्या बँकेत) आहेत. त्याच ठिकाणी ते ब्लॉक केले जातील. यासाठी


फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरुवातीचे तास महत्त्वाचे आहेत. तसेच पोर्टलवर तक्रार केल्यानंतर तक्रारीचे पुढे काय होते? तपास कुठेपर्यंत आला आहे. तक्रारीचा स्टेटस काय आहे, याची माहिती कोणत्याही क्षणाला तुमच्या मोबाइल हॅण्डसेटवर पोर्टलद्वारे मिळते. त्यामुळे तपासाची माहिती कोणालाही विचारण्यासाठी जावे लागत नाही किंवा पोलीस ठाण्यातही यावे लागत नाही.


‘सायबर क्राइम’ वाढल्यामुळे तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी शासनाने पोर्टल तयार केले आहे. यात सर्व बँकांचे नोडल अधिकारी आहेत. फसवणुकीचे पैसे कोणत्याही बँकेत असतील, तर ते परत करण्याची व्यवस्था होते. त्यासाठी फसवणुकीनंतर कमीत-कमी वेळेत पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक आहे.- राजन जगताप, पोलीस निरिक्षण
(सायबर सेल)

Comments
Add Comment

'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्ते अलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार

रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार? अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते;

अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत

जिल्ह्यासाठी २८८ कोटींचा विकासनिधी

आराखड्यापैकी ६० टक्के निधी मिळाला, ५० टक्क्यांचे वितरण अलिबाग : राज्य सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. मात्र

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या