गणेश विसर्जनासाठी पश्चिम रेल्वेच्या आठ विशेष ट्रेन

  93

मुंबई (वार्ताहर) : प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.


तब्बल दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर मुंबईत निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी ठाणे, कल्याण आणि पश्चिम उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. या नागरिकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने दर वर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्थीच्या दिवशी ( ता. ९) रात्री उशिरापर्यंत आठ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ४-४ लोकल चालविण्यात येणार आहे.


चर्चगेटहून रात्री १.१५ वा., रात्री १.५५ वा., रात्री २.२५ वा., रात्री ३.२० वाजता या लोकल सुटणार आहेत. परतीच्या मार्गावर विरारहून रात्री १२.१५ वा., रात्री १२.४५ वा., रात्री. १.४० वा. आणि चौथी लोकल पहाटे ३ वाजता धावणार आहे. त्यामुळे भाविकांची रात्रीच्या वेळी प्रवासाची सोय होणार आहे.

Comments
Add Comment

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची

Narayan Rane : "राज शिवसेनेत आला की, उद्धव ठाकरे नगण्य होणार"; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? : खासदार नारायण राणे मुंबई : “राज ठाकरे पुन्हा उद्धव

पुरावे दिले तर खुलासा करेन; राऊतांच्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंचे थेट आव्हान

आरोप करणे हा राऊतांचा नेहमीचा उद्योग - अमोल मिटकरी मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री

Prasad Lad : बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : विधान परिषदेत आज भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. लाड यांचं बनावट लेटरहेड वापरून

'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध